नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भगवान शिवाचा बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे ज्योतिर्लिंग श्रीशैल मल्लिकार्जुन याबद्दल माहिती घेणार आहोत
त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. लाला लजपतराय यांनी त्यांच्या सहकार्याने बरोबर आर्य समाजाची स्थापना केली.काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची 1888 आणि 1889 मध्ये निवड झाली. 1892 मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचा राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करीत असेल, त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये नियत नियमितपणे आपले लेखन केले.लाला लजपत राय यांनी शिक्षणासाठी कॉलेज विद्यालय काढले होते. 1947 साली भारताच्या झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले. 1914 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी लाला लजपत राय यांनी वकील बंद केली.
1914 मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर 1917 मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर 1997 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली. ते 1927 ते 1930 पर्यंत अमेरिकेत होते.
जय मल्लिकार्जुन जय मल्लिकार्जुन जयघोषाने आंध्र प्रदेशातील कुडनूर जिल्ह्यातील श्रीशैलमच्या डोंगररांगा व पातालगंगेचा परिसर दुमदुमून जातो. या भागात केळीच्या व बिल्व( बेलाची) वृक्षांची वने फार मोठ्या प्रमाणात आहेत. प्राचीन काळी या प्रदेशात भगवान शंकर येत असत याच ठिकाणी त्यांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. व याला आपले निवास स्थान बनवले म्हणून या स्थानाला कैलास निवास देखील म्हटले जाते.
कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून जेव्हा कैलास पर्वतावर परतले तेव्हा नारदाने त्यांना श्री गणेशाच्या विवाहाचा प्रसंग सांगितला हे वृत्त एकूण कुमार कार्तिकी याला फार राग आला आणि पार्वती व वडील भगवान शंकरांनी त्यांना खूप समजावले पण कोणाचेही न ऐकता ते रागातून कँच पर्वतावर जाऊन बसले कुमार कार्तिकेच्या अशा कृत्याने पार्वतीला फार दुःख झाले खूप समजावूनही तिला धीर धरवेना म्हणून कार्तिकेची समजूत काढण्यासाठी शंकराने देवरुशींना पाठवले पण तेही निराश होऊन परतले नंतर पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शंकर लांब निघून,पर्वतावर पुत्राची भेट न झाल्याने त्याला अन्य जागी शोधायला जाण्यापूर्वी शिवपार्वतीने येथे आपली ज्योत स्थापन केली.
त्याच दिवसापासून ती दिव्य ज्योती मलिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या नावाने प्रसिद्ध झाली. व ते क्षेत्र दिव्य क्षेत्र बनले आजही या ठिकाणी पौर्णिमेला पार्वती व अमावस्येला भगवान शंकर येथे येतात. या दिवस दिव्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने धन्य धान्याची समृद्धी होऊन भाविकांना सुख ऐश्वर्य माणसांना प्राप्त होतात त्याच्या सर्व मनोकामना येथे पूर्ण होतात.
फार पूर्वी एकदा तीर्थयात्रा करत असताना अर्जुन या कर्दळी वनात आला त्यावेळी त्याच्या धनुर्विद्येची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर यांनी भिल्लाचे रूप धारण केले. आणि एकावर डुकराची शिकार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावले त्याचवेळी अर्जुन देखील त्या डुकराचा पाठलाग करत होता दोघांचेही बाण एकाच वेळी त्या रानडुकराला लागले. त्या शिकारीवर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी दोघांची युद्ध सुरू झाले. या युद्धात अर्जुनाचा विजय झाला. त्यावेळी भगवान शंकराने प्रसन्न होऊन अर्जुनाला आशीर्वाद दिला. हे युद्ध किरीताअर्जुन युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. याच केळीच्या बागेत एक राजकन्या तपश्चर्या करीत होती. एक दिवस तिने एक अद्भुत दृश्य पाहिले. एका बिल्व वृक्षाच्या खाली एक कपिला गाय उभी राहून आपल्या चारही स्तनांमधून दुधाच्या धारा जमिनीवर सोडत होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्या गाईचा नित्यक्रम होता. जेव्हा चंद्रावतीने त्या जागी खणले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला त्या ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग असल्याचे तिला दिसून आले. सूर्यासारखा तेजस्वी असलेला त्या दिव्य शिवलिंगातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या. त्या शिवलिंगाची चंद्रावतीने मनोभावाने पूजा केली. व त्या ठिकाणी एक अतिशय भव्य असे मंदिर बांधले.भगवान शंकर चंद्रवती वर प्रसन्न झाले. दिव्य विमानात बसून ती कैलासाला गेली. व तिला मुक्ती मिळाली या मंदिराच्या शिल्पपट्टीवर चंद्रावतीची ही कथा कोरलेली आहे.
श्री शैल्य मल्लिकार्जुन या पवित्र क्षेत्राच्या पायथ्याशी कृष्णा नदीने पाताळगंगेचे रूप घेतलेले आहे. लाखो भक्तगण या नदीत स्नान करून ज्योतिर्लिंगाचे दर्शनाला जातात. कर्नाटक स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व अन्नछत्र ही सुरू केले होते. विजय नगरच्या राजांनीही येथे गोपूर तलाव, मंदिर बांधले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी येथे पाताळगंगेला 852 पायऱ्यांचा एक मजबूत घाट बांधला शैल्य पर्वताचा हा प्रदेश पूर्वी दुर्गम कष्टप्रद आणि भयानक वाटायचा पण भाविकांनी श्रद्धाच्या बळावर येथे दर्शन घेण्यास धन्यताच मांडली भगवान श्री रामचंद्र, नारद ,पांडव , हिरण्यकश्यपू इत्यादी पुरण पुरुषांनीही येथे येऊन दर्शन घेतलेले आहे. या ठिकाणी देखील निवासाची व्यवस्था आहे दूरवरून आलेल्या शिवभक्तांनी येथे आल्यानंतर आराम करावा व त्यानंतर श्री मल्लिका अर्जुन यांचे दर्शन घ्यावे. मल्लिकार्जुन येथे रेल्वेने, बसने तसेच स्वतःची गाडी करून देखील जाता येते या ठिकाणी असलेले शिवलिंग अतिशय मनमोहक आहे तिथे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते तेथे आजूबाजूला देखील पाहण्यासारख्या जागा आहेत .
शिवभक्तांसाठी जय भोलेनाथ हर हर महादेव ओम नमः शिवाय
प्राचीन काळामध्ये सोलापूरचे भाविक येथील किल्ल्यामधील उदध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत असत. परंतु १९१७ साली लोकांना त्या मंदीरात जाण्यास इंग्रजांनी बंदी घातल्यामुळे किल्ल्यातील शिवलिंग येथे हलविण्यात आले
किल्यात टोकापर्यंत काही इमारती बुडालेल्या असाव्यात याची शंका तत्कालीन कलेक्टरना आल्याने त्यांना पाहणी केली तेव्हा मंदिराचे काही बुजलेले स्तभ दिसले. म्हणून इ.स.१९१९ मध्ये लार्ड ज गव्हर्नर यांच्या परवानगीने उत्खनन करून शोध घेतला तेव्हा उद्धवस्त अवस्थेत चालुक्य काळातील हिंदू शिवालय व गर्भगृह सापडले. एका शिवसेवकांला मूर्ती व शिवलिंग सापडले. हेच शिवलिंग घेऊन बाळीवेस येथे मंदीर बांधण्यात आले.
मंदिर पूर्ण दगडी बांधकामचे आहे व भिंतीच्या खालच्या बाजूस नक्षी कामाची पट्टी आहे पुर्वभिमुख असलेल्या या मंदिराचे दगडी स्तंभ अत्यंत कोरीव आहेत. मंदिराचे गाभाऱ्यात छतावर सभामंडपवर फुलांची नक्षी आहे. या मंदिरात एकूण ३२ स्तंभ आहेत. दोन्हीं बाजूस बसण्यासाठी कक्षासाने् आहेत. स्टँभ ताळखडा चौरस्कृती असून तो अत्यंत सुंदर कलाकृती आहे
मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे स्थान आहे. भगवान शंकर म्हणजेच अर्जुन आणि माता-पार्वती म्हणजेच मलिका असे समजले जाते. म्हणूनच या मंदिराला “मल्लिकार्जुन” असे म्हणतात.
२०१४ साली आंध्र प्रदेश राज्याचे दोन भाग करून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण करण्यात आले व श्रीशैलम हे स्थळ सध्या आंध्र प्रदेशात येत असले तरी तेलंगणा व आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरच आहे.
श्रीशैलम हे स्थळ येथील मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगामुळे प्रसिद्ध आहे हे तर आपण जाणून घेतलेच मात्र याच ठिकाणी भ्रमराम्बा देवीचे जागृत पीठ आहे. स्कंद पुराणातील श्री शैल कांड नामक अध्यायात या देवस्थानाचे वर्णन आले आहे. या मंदिराच्या माहात्म्यामुळे आदी शंकराचार्य यांनी सुद्धा या स्थळास भेट देऊन शिवानन्दलहरी या ग्रंथांची रचना केली होती.
श्रीशैलम या स्थळाचे भौगोलिक स्थान सुद्धा विलोभनीय असून एका उंच टेकडीवर निबिड अरण्यात हे स्थान असून या टेकडीच्या बाजूने एका खोल खोऱ्यातून कृष्णा नदी वाहते. या ठिकाणी कृष्णा नदीला धरण बांधण्यात आले आहे व ते सुद्धा एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
श्रीशैलम येथील श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर पाहण्यास जगभरातून भाविक येत असतात. हे मंदिर अतिशय भव्य आणि पुरातन असून मंदिराच्या चोहोबाजूस करड्या रंगाचे पाषाण वापरून तटबंदी करण्यात आली आहे आणि या तटबंदीसाठी जे पाषाण वापरले गेले आहेत त्या प्रत्येक पाषाणावर विविध प्रकारची चित्रे कोरण्यात आली आहेत.