महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती | Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली अशा श्री महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अधिक माहिती घेणार आहोत

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय|Mahatma jyotiba phule biography in marathi

  • संपूर्ण नाव – महात्मा ज्योतिबा फुले
  • जन्म तारीख- 11 एप्रिल 1827
  • जन्मगाव – कटगुण सातारा
  • आई व वडील- चिमणाबाई व गोविंदराव फुले
  • सामाजिक कार्य – सत्यशोधक समाजाची स्थापना
  • मृत्यू– 28 नोव्हेंबर 1890



महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला महाराष्ट्रत झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले आहे. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते.

चिमणाबाई ज्योतिबा नऊ दहा महिन्यांचे असतानाच देवाघरी गेली सगुनाबाई क्षीरसागर यांनी ज्योतिबांना सांभाळले त्यांचे शिक्षण इंग्रजी शाळेत होऊन ते इंग्रजी भाषेत तरंगत झाले ज्योतिबांचे वडील माळी होते मूळ आडनाव गोरे होते पण बागकाम करतात म्हणून फुले आडनाव पडले बागेत जसे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे असतात त्याप्रमाणे ज्योतिबा फुले या माळीने समाजसेवेचे उद्यान फुलविले आईविख्यात बंडखोर विचारवंत थॉमस पेन याचे दि राइट्स ऑफ मॅन हे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आले बंडासाठी आवश्यक असा स्पोटक दारूगोळा तयार झाला मित्रांच्या लग्नात त्याचा अपमान झाला आणि साठलेल्या दारू गोळ्यावर ठिणगी पडली.



महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य


महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 वर्षी शूद्र अति शूद्र मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान महात्मा फुले यांनी त्यांना मिळवून दिला माणसाचे मन हे त्याचे मंदिर असते” विद्यावेना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली ,गती विना वित्त गेले एवढे अनर्थ एका विद्याने केले “शिक्षण हे समाज मानस परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात येत अस त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले शाळा तर उघडल्यास त्याचबरोबर अनाथ आश्रम काढले वृत्तपत्र काढले धर्मजन्माने न मिळता माणसाच्या स्वतःच्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी मुलींची शाळा सुरू केली हे घरच्यांना आवडले नाही म्हणून त्यांना 1849 वर्षी घराबाहेर काढले तरी तत्व सोडले नाही 1889 वर्षी स्वतःची विहीर बहुत अस्पृश्यांना पाणी घेण्यासाठी मोकळे केली विधवा विवाहाचा पुरस्कार केला बालविवाहाला विरोध केला 1865 मध्ये काशीबाई नामक ब्राह्मण विधवेला आश्रय दिला तिचे प्रसूती गुप्तपणे घडवली तेव्हा स्वतः सावित्रीबाईंनी मुलाची नाळ कापली. काशीबाई यांचा मुलगा यशवंत यालाच पुढे स्वतःचा दत्तक पुत्र म्हणून घोषित केलं.

केशवपन विरुद्ध चळवळ उभारली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लग्न विधींसाठी मराठी मंगलाष्टके रचली. गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तके लिहिली
शेतकऱ्यांच्या व्यथा इंग्रज प्रशासनाच्या क कानी पोहोचवल्या शेतकरी हा समाजाचा कणा आहे अन्नदाता आहे,असे मत मांडले.
शेतकऱ्यांच्या जमिनी सावरकरांनी हडप करू नये यासाठी मोठी चळवळ उभारली.

1906 वर्षी मुंबईतील गिरणी कामगारांचा पहिला संघ स्थापन झाला. या कामात आपला मित्र नारायण लोखंडे यांना ज्योतिबा रावांनी खास मदत केली. यांनी 1868 व्या वर्षी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. त्यांनी स्वतंत्र समता लोकशाही विज्ञान या आधुनिक मूल्यांवर भर देऊन सामाजिक क्रांती केली. विचारांना कृतिशीलतेची जोड दिली. दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला संरक्षण दिले. दारूचे दुकाने उघडू नये म्हणून परवाने देऊ नयेत म्हणून प्रयत्न केले बंदी शाळेतून सुटलेल्या टिळक आगरकरांचा सत्कार केला.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्र श्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्माही उपाधी बहाल केली त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला त्यांना मराठी इंग्रजी कन्नड तमिळ गुजराती उर्दू इत्यादी भाषा येत होत्या तीन ऑगस्ट 1948 ला पुण्यात भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली त्यावेळेस आठ मुली उपस्थित होत्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना साक्षर केले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका बनवलं ही पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका ही बनवलं प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले तज्ञ होते.

28 जानेवारी 1863 रोजी राहत्या घरी पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली 8 मार्च 1864 रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो या समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केले गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना त्यांनी समर्पित केला सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ त्यांच्या1891 मध्ये प्रकाशित झाला

सत्यशोधक समाज


24 सप्टेंबर इस 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाधान पर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते वेदांना जुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली त्यांनी जातीय भेद आणि चतुर्वरणीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा श्री विभाग श्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केली सावित्रीबाई त्यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्या शाळेच्या शिक्षिकाही होत्या दिनबिंदू प्रकाशाने सत्यशोधक चळवळीमध्ये लेखन प्रकाशनाचे केले

लेखन साहित्य



सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण गणतंत्र ग्रंथ मानला जातो या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे सार्थक साप्ताहिक चालविले जाईल तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता अभंगांच्या धरतीवर त्यांनी असे अनेक अखंड रचले त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवने यांना त्यांनी समर्पित केला अस्पृश्यांची कैफ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा फुले यांचा शेवटचा ग्रंथ तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोर पण या ग्रंथातून लक्षात येतात.

तृतीय रत्न



तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे ज्योतिबा रावांनी 28व्या वर्षी इस 1855 वर्षी हे नाटक लिहिले नाटक लिहिण्याचे हेतू ज्योतिबा लिहितात भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्र कसे कसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशात आपल्यांनी पक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी सुधरास खरे ज्ञान सांगून त्यास कसे कसे सत्य धर्मावर आणतात या सर्व गोष्टींविषयी एक लहानसे नाटक करून इस 1855 मध्ये दक्षिण प्राईड कमिटीला अर्पण केले

वाघ्या व मुरळी प्रथा


महात्मा फुलेंच्या काळात अनेक अनिष्ट प्रथा प्रचलित होत्या, त्यापैकीच एक वाघ्या व मुरळीप्रथा होय. खंडोबा ही भारतीय समाजातील प्राचीन ग्रामदेवता आहे. खंडोबा हा मूळचा कर्नाटकातला लोक देव असून, तो कर्नाटकात मल्हार या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात या देवतेचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. अस्पृश्यांपासून ब्राह्मणांपर्यंतचे लोक तसेच मुस्लिम लोकही या देवतेचे उपासक आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2४5 खंडोबाची स्थानिक खंडोबा या देवाला आपल्या इच्छापूर्तीसाठी लोक नवस करीत असत पुत्र प्राप्तीसाठी ही नवस केला जात असेत. अशा वेळेस त्यांना पुत्र प्राप्ती झाली तर ते वाघ्या व मुलगी जन्माला आली तर मुरळी म्हणून खंडोबाला सोडल्या जाईल .

बहुपत्नीत्वाला विरोध



महात्मा फुलेंच्या काळात बहुपत्नीत्वाची पद्धत प्रचलित होती ब्राह्मण व श्रीमंत लोग एकापेक्षा अनेक बायका करीत असत. स्त्री व पुरुष समान असल्याने हा अन्याय आहे. असे महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटत असे. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करणे हा प्रकार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दृष्टीने निंदनीय होता.

शेतकऱ्यांसाठी चळवळ



भारत हा कृषिप्रधान देश आहे महाराष्ट्रातही याला अपवाद नव्हता. महाराष्ट्रातील शेतकरी याला अपवाद नव्हता. महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार वर्ग हा आर्थिकदृष्ट्या सबळ नव्हता, ते अज्ञानी होते परंतु शेतकरी अज्ञान व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल केल्या होता. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या लेखांमध्ये याचे वर्णन केलेले आहे.

मृत्यू



अशा या महान शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या ज्योतिबा फुले यांचा 28 नोव्हेंबर 1890 व्या वर्षी निधन झाले

Leave a Comment